spot_img
अहमदनगर३० रस्‍त्‍यांकरीता १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर; मंत्री विखे पाटील...

३० रस्‍त्‍यांकरीता १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर; मंत्री विखे पाटील यांनी दिली मोठी माहिती, ‘या’ भागातील..

spot_img

लोणी । नगर सहयाद्री:-
जिल्‍हा परिषद परिषदेच्‍या ग्रामपंचायत विभागा अंतर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी देण्‍यात येणा-या विशेष अनुदान योजनेतून आश्‍वी महसूल मंडळातील विविध गावांमधील ३० रस्‍त्‍यांकरीता १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या माध्‍यमातून हा निधी मंजुर झाल्‍याने या तीस गावांमधील रस्‍त्‍यांची कामे आता मार्गी लागणार आहेत.

ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत निधी दिला जातो. या माध्‍यमातून गावातील पायाभूत सुविधांची कामे करता येतात. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात सदर अनुदान मंजुर व्‍हावे याकरीता प्रस्‍ताव सादर करण्‍यात आले होते. पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील याबाबत जिल्‍हा परिषदेच्‍या आधिका-यांना ग्रामीण भागातील रस्‍त्‍यांकरीता निधी तातडीने उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत सुचना दि‍ल्‍या होत्‍या. शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्‍ठ असलेल्‍या संगमनेर तालुक्‍यातील ३० गावांकरीता १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर करण्‍यात आला असून, या निधीस आता प्रशासकीय मान्‍यताही मिळाल्‍याने रस्‍त्‍यांची कामे होण्‍याचा मार्ग सुकर झाला आहे.

आश्‍वी आणि पंचक्रोशितील गावांना यापुर्वीही मंत्री विखे पाटील यांनी निधी मंजुर करुन दिला होता. या निधीतून गावातील रस्‍ते चांगल्‍या पध्‍दतीने तयार झाल्‍याने या गावांचे दळणवळण अधिक वाढले आहे. ग्रामीण भागातून येणारे रस्‍ते थेट मोठ्या रस्‍त्‍यांना जोडले गेल्‍याने या भागातील गावांचा थेट संपर्क आता मोठ्या गावांशी होवू लागला आहे. स्‍थानिक नागरीक, विद्यार्थी, व्‍यापारी, शेतकरी यांच्‍याकरीता रस्‍त्‍यांचे तयार झालेले जाळे महत्‍वपूर्ण ठरले आहे.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...