spot_img
अहमदनगरब्रेकिंग : मराठा आरक्षणाबत खा. सुजय विखेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

ब्रेकिंग : मराठा आरक्षणाबत खा. सुजय विखेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

spot_img

लोणी / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणी काही बोलले तरी त्याचा विपर्यास होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. असे वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

खा.सुजय विखे पाटील यांनी राहाता, शिर्डी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मागणी पाठिंबा असल्याचे नमूद करून खा. विखे पाटील म्हणाले की, आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन आता नेत्यांची घर जाळण्यापर्यत येवून ठेपणे हे योग्य नाही.

आरक्षणाच्या प्रश्नावर कोणत्याही लोकप्रतिनीधीने व्यक्त केलेल्या प्रतिक्रयेचा विपर्यास केला जाणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वच लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दिला आहे. परंतू आज जाहीर भाष्य करायला सरपंच पदापासून ते सर्वच पदावर असलेले नेते पुढे येत नाहीत. याकडे लक्ष वेधून प्रतिक्रीया व्यक्त करताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे विखे पाटील म्हणाले.

आरक्षणाच्या बाबतीत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यापेक्षा पक्षीय जोडे बाजूला ठेवून आरक्षणाच्या मुद्द्यावर सामूहिकपणे काय करता येईल याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...

नगर शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर शहर महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ राहावे, यासाठी स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम...

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...