spot_img
ब्रेकिंगHealth Tips:..'या' भाज्या आरोगयाला हानीकारक! वेळीच घ्या काळजी अन्यथा..

Health Tips:..’या’ भाज्या आरोगयाला हानीकारक! वेळीच घ्या काळजी अन्यथा..

spot_img

नगर सहयाद्री टीम-
उत्तम आरोग्य हाच खरा ‘दागिना’ आहे. उत्तम आरोगयासाठी सर्वत्तम आहाराची गरज असते. डॉक्ट्रर वेळोवेळी फळे आणि भाज्या जास्तीत जास्त प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. पण अशा काही भाज्या आहेत ‘त्या’ आरोग्याला हानिकारक ठरत आसतात. जंक फूड पासून सावध होत आपण ते खाणं बंद करतो पण भाज्यांमध्ये सुद्धा काही भाज्या अशा आहेत ज्या जास्त प्रमाणात खाल्ल्यानं नुकसान होतं.

वाटाणा-वाटाण्याची भाजी अनेकांना आवडते. वाटण्याची भाजी बनवायला सोपी आणि चवीला मस्त असते. वाटण्याचं सेवन जर मर्यादित प्रमाणात होत असेल तर ते आरोग्यासाठी चांगलं आहे पण वाटण्याचं सेवन अधिक प्रमाणात होत असेल तर त्याने पोट वाढतं. वाटाणा फायबरचा चांगला स्रोत आहे. फायबरच्या अतिसेवनामुळे पोट वाढते.

बटाटे- बटाटे सगळ्यांनाच खायला आवडतात. आपल्याला जवळजवळ सगळ्याच पदार्थांमध्ये बटाटे असतात. स्नॅक्स, भाजी, भजी किंवा अजून काही असेल प्रत्येकात बटाटे. पण बटाटे आरोग्यासाठी फायदेशीर नसतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी बटाटे खाऊ नयेत.

बीट-आहारात बीटरूटचा समावेश करताना विचारपूर्वक करा. जास्त प्रमाणात बीटरूट खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते, बीटरूटमध्ये नैसर्गिक साखर जास्त प्रमाणात असते. बीटरूटचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत पण ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी याचे सेवन करू नये.

टोमॅटो- डब्बाबंद टोमॅटो असतं. टोमॅटो डब्ब्यात टाकून त्याला स्टोअर केलं जातं आणि त्याची भाजी खाल्ली जाते. य टोमॅटोमध्ये सोडियमचे प्रमाण खूप असते ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. हे टोमॅटो प्रक्रिया करून डब्ब्यात बंद करून फ्रिजमध्ये ठेवले जातात. डब्बा बंद टोमॅटो खाण्याऐवजी तुम्ही ताजे टोमॅटो खाऊ शकता ते आरोग्यासाठी चांगले असतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भूमिपुत्रांच्या उपोषणाकडे राजकीय पुढाऱ्यांची पाठ

भूमिपुत्रांच्या उपोषणाकडे राजकीय पुढाऱ्यांची पाठ प्रशासकीय अधिकारी सुद्धा फिरकलेच नाहीत पाण्याच्या प्रश्नावर पारनेर तहसीलवर सुरू आहे...

पाऊस आला अन पूलच गेला वाहून! नागरिकांची प्रतिक्रिया काय?

निघोज | नगर सह्याद्री:- निघोज परिसरात बुधवार दि.२५ रोजी दुपार पासून ते मध्यरात्री उशिरा पर्यंत...

१५ लाखांची क्षणांत फसवणूक! व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- बिटकॉइन ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष...

महापालिका कर्मचारी भरती प्रक्रिया रखडली; कारण काय?

अहमदनगर | नगर सह्याद्री:- महापालिकेची १३४ पदांची कर्मचारी भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे. सातवा वेतन...