spot_img
अहमदनगरसावधान! महानगरपालिकेकडून दुकानदारांना होतोय दंड, तुम्ही ही 'ते' काम करत नाही ना?

सावधान! महानगरपालिकेकडून दुकानदारांना होतोय दंड, तुम्ही ही ‘ते’ काम करत नाही ना?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
प्लास्टिक संदर्भात महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे हॉटेल्स व दुकाने अशा पाच आस्थापनांना महापालिकेकडून २५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. शहरात सध्या केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मसफाई अपनाओ, बिमारी भगाओफ अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार मसफाई अपनाओ, बिमारी भगाओफ अभियानांतर्गत हरितकचरा उचलणे, प्लास्टिक बंदीची शंभर टक्के अंमलबजावणी करून प्लास्टिकचा कचरा कमी करणे, यासह आरोग्य विषयक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अंतर्गत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रोफेसर कॉलनी चौकातील दुकाने, हॉटेल्सची तपासणी केली.

यात प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍या रुचिरा स्वीट्स, हॉट चिप्स, अक्किज बर्गर कॅफे, बॉम्बे ग्रिल कॅफे, जाधव वडेवाले या पाच आस्थापनांना प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे २५ हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच १५ किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत स्वच्छता निरीक्षक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...

नगर शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर शहर महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ राहावे, यासाठी स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम...

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...

politics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

अहमदनगर । नगर सहयाद्री :- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात...