spot_img
अहमदनगरजिंकून येणार्‍यालाच मिळणार तिकिट! आमदारांच्या बैठकीत फडणवीस काय-काय म्हणाले? वाचा सविस्तर ..

जिंकून येणार्‍यालाच मिळणार तिकिट! आमदारांच्या बैठकीत फडणवीस काय-काय म्हणाले? वाचा सविस्तर ..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विभागानुसार भाजप आमदारांच्या बैठका घेत असल्याचं चित्र दिसत आहे. गुरूवारी रात्री फडणवीसांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आमदारांना विधानसभेचा कानमंत्र दिला. तसेच जिंकून येणार्‍या आमदारालाच तिकिट देणार असल्याचे सांगितल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची धाकधूक वाढली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी रात्री पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करेल असेही त्यांनी आमदारांना सांगितले आहे. लोकसभेत ज्या ज्या मुद्यांवर फटका बसला, त्याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, याबरोबरच शेतमालाचा भाव यावरही आमदारांसोबच फडणवीसांनी चर्चा केली आहे. लाडकी बहिण, युवा प्रशिक्षण या योजना प्रत्येक गावात पोहोचवा. महायुतीच्या स्थानिक सर्व पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन काम करा अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच जिंकून येणार्‍या आमदारालाच तिकिट देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे आता आमदारांची धाकधूक वाढली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...