spot_img
अहमदनगर"पोस्टर बॉय आडवा आला तर सरळ करा" आ. राणे नेमकं काय म्हणाले?...

“पोस्टर बॉय आडवा आला तर सरळ करा” आ. राणे नेमकं काय म्हणाले? पहा..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
यापुढील काळामध्ये हिंदूंनी अन्याय सहन करू नका. अन्याय करणाऱ्यांचे हात आणि पाय उखडून टाका, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही कारण आता सरकार हिंदूंची आहे आणि हा देश हिंदूंचा आहे, असे आवाहन आ. नितेश राणे यांनी केले.

कर्जत शहरातील हनुमान मंदिर व सिद्धटेक येथील गणपती मंदिराच्या परिसरामध्ये अन्य धर्मियांनी केलेले अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी कर्जत शहरामध्ये हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अक्काबाई मंदिरापासून हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली.

यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने महिला युवक व पुरुष सहभागी झाले होते. ग्रामदैवत गोधड महाराज मंदिरामध्ये दर्शन घेऊन कापरेवाडी वेस येथे अतिक्रमण केलेल्या हनुमान मंदिर परिसरामध्ये मोर्चा नेण्यात आला. त्यावेळी चांगलाच तणाव त्याठिकाणी निर्माण झाला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. मोर्चा बाजारतळ येथे गेल्यावर त्याचे जाहीर सभेमध्ये रूपांतर झाले.

सभेत राणे म्हणाले, हा देश हिंदूंचा आहे. या देशावर सत्ता ही हिंदूचीच राहील आणि या देशावर हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. याचप्रमाणे पुढील काळामध्ये देखील राहावे लागणार आहे. अन्यथा हे हिरवे साप कधीही त्यांचा विळखा सर्व हिंदूंना घालून आपले गाव परिसर आणि देश यामधून आपल्याला बाहेर काढण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत.

यावेळी आ. राणे यांनी नाव न घेता आ. रोहित पवार यांच्यावर टीका केली. अधिकाऱ्यांनी पोस्टर बॉय याचे ऐकून त्या धर्मियांना विनाकारण संरक्षण देऊ नका. सरकार देशात आणि राज्यात भाजपचे आहे हे विसरू नका, जर पुढील काही दिवसांमध्ये हे अतिक्रमण काढले नाही तर मी स्वतः याठिकाणी येऊन बुलडोझर लावून हे अतिक्रमण दूर दूर करेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहील. आणि तो पोस्टर बॉय आडवा आला तर त्याला देखील सरळ करू, असा इशारा राणे यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...