spot_img
ब्रेकिंगदोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार; नागरिकांकडून शाळेची तोडफोड, कुठे घडली घटना?

दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार; नागरिकांकडून शाळेची तोडफोड, कुठे घडली घटना?

spot_img

ठाणे | नगर सह्याद्री:-
कोलकतामधील हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉटरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेप्रकरणी देशभरात संतापाची लाट पसरली आहे. यातच बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईमधील बदलापूरमध्ये एका नमांकित शाळेत झालेल्या संतापजनक घटनेबाबत जनता रस्त्यावर उतरली.

जनतेकडून तीव्र निदर्शने करण्यात आली असून बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. त्याचदरम्यान, ज्या शाळेत ही घटना घडली होती. त्या शाळेत संतप्त जमावाने तोडफोड केली. या शाळेची तोडफोड करण्यामध्ये महिला आंदोलकही सहभागी आहेत. त्याचदरम्यान, आंदोलनकर्त्यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन येथे दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे.

या दगडफेकीत काही महिलांना दुखापत झाली आहे. तसेच काही पोलीसही जखमी झाले आहेत. दरम्यान, या आंदोलनाला आता हिंसक वळण लागत आहे. शाळेच्या आत काही आंदोलक शिरले आहेत. पोलिसांकडून शाळेमध्ये अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. बदलापुरात या घटेनमुळे अतिशय उद्रेक झाला आहे. पोलिसांना आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, आंदोलक हे ऐकण्याच्या भुमिकेत दिसत नाहीय. शाळा परिसरात आता आंदोलकांची धरपकड सुरु झाली आहे.

आंदोलाममुळे सकाळी साडेनऊ वाजेपासून बदलापूर ते कर्जत दरम्यान लोकल सेवा ठप्प झाली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर देखील पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाच्या विरोधात पालक तसेच आंदोलक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, दोन चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो कंत्राटदारामार्फत शाळेत सफाईचे काम करत होता.

काय आहे प्रकरण?
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. सफाई कर्मचार्‍यानेच मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना १२ आणि १३ ऑगस्ट रोजी घडली. त्यानंतर मुलींच्या पालकांनी याविरोधात पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेण्यास १२ तास लावले, असा आरोप पालकांनी केला होता. या प्रकरणी शाळेने माफीनामा दिला आहे.

एसआयटी गठित करण्याचे आदेश
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...