spot_img
अहमदनगरअल्पवयीन मुलीची १२ तासांत सुटका; कोतवाली पोलिसांची कारवाई

अल्पवयीन मुलीची १२ तासांत सुटका; कोतवाली पोलिसांची कारवाई

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणातील मुलगी अल्पवयीन होती आणि आरोपी विधीसंघर्ष बालक होता. त्या अल्पवयीने मुुलीची १२ तासात सुटका करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या आदेशानुसार, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान आरोपीने मित्राकडे पैशांची मागणी केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पिडीत मुलगी व आरोपी कर्जत रेल्वे स्टेशन, जि. रायगड येथे असल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शोध पथकाने तात्काळ कर्जत रेल्वे पोलिसांची मदत घेऊन तपास सुरू केला आणि पिडीत मुलगी, आरोपी व एक अल्पवयीन मित्र यांना ताब्यात घेतले. त्यांना कोतवाली पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, पुढील तपास सपोनि विकास काळे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि विकास काळे, पोसई प्रविण पाटील व गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, गणेश धोत्रे, सलीम शेख, नकुल टिपरे, विजय काळे, पोकाँ अभय कदम, सतिश शिंदे, मपोकाँ योगिता साळवे व दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...