spot_img
अहमदनगरखैरी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांनी केला आनंद व्यक्त, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

खैरी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो; शेतकऱ्यांनी केला आनंद व्यक्त, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

spot_img

नगर सह्याद्री / नासीर पठाण
जामखेड – खर्डा येथील दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता खैरी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग मराठवाड्याकडे झेपायला आहे. या भागातील शेतीचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच नदीकाठच्या गावे, वस्त्या, तांडे तेथील शेतकरी व ग्रामस्थ यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

या क्षेत्रातील आपले प्राणी, पशुधन, मौल्यवान वस्तू, कृषी पंप, शेती अवजारे इत्यादी सुरक्षित जागी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे नदीपात्रातून ये जा करताना दक्षता घ्यावी असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

खैरी मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी 562.30 मीटर आहे एकूण साठा 533.60 द.श.घ फु.असून उपयुक्त साठा 485.22 द.श.घ.फु.सध्या उपयुक्त साठा 100 टक्के झाला आहे. मागील वर्षी पावसाने हात आकडता घेतल्याने खैरी प्रकल्पाचा उन्हाळ्यात मृतसाठा झाला होता. त्यामुळे उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला होता ऊस क्षेत्र घटले होते पुढील पावसाळ्यात खैरी प्रकल्प भरतो की नाही याची चिंता परिसरातील शेतकऱ्यांना लागली होती. परंतु खर्डा जवळील मोहरी तलाव पहिल्याच पावसात भरल्यामुळे व सांडव्याचा पाण्याचा विसर्ग दरवाडी येथील खर नदीद्वारे महिना भरापासून खैरी मध्यम प्रकल्पाकडे सुरू होता.

तसेच खर्डा येथील कौतुका नदीचे पाणीही खैरी प्रकल्पात जात होते,तसेच मोहरी भागाच्या घाटमाथ्यावर सतत मोठा पाऊस पडत राहिल्याने या दोन्ही नद्यांचा प्रवाह सुरू असल्याने अखेर या भागाला वरदान ठरणारा खैरी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला व सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग पुढे जात असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले असता यावेळी शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...