spot_img
ब्रेकिंग"आम्ही जवळ असल्याने उलट्या..." ; एका वक्तव्यावरुन महायुतीत 'मिठाचा खडा'

“आम्ही जवळ असल्याने उलट्या…” ; एका वक्तव्यावरुन महायुतीत ‘मिठाचा खडा’

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरुन महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. ज्यांना आम्ही जवळ असल्याने उलट्या होतात, अशा ठिकाणी आम्ही थांबणं जनतेला आवडणार नाही, सत्ता गेली चुलीत अशा पद्धतीच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्त उमेश पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी बाबतीत केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादीसोबत आपले कधीच पटले नाही. कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आलं की उलट्या होतात. असे विधान तानाजी सावंत यांनी केलं. तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी बद्दल त्यांची नाराजी उघडपणे दिसून येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्त उमेश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तानाजी सावंतांनी असं बोलणं म्हणजे आम्ही सत्तेसाठी लाचार झालो आहोत, असं लोक म्हणतील.

ज्यांना आम्ही जवळ असल्याने उलट्या होतात, अशा ठिकाणी आम्ही थांबणं कार्यकर्त्यांना, महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही. महाराष्ट्राची, मराठी मनाची एक अस्मिता आहे. अशा वक्तव्यामुळे उद्या राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. लोकांना वाटेल राजकारणी लोक काय बोलतात, इतके घाणेरडे लोक असतील, तर राजकारण आणि सत्ता गेली चुलीत” असं उमेश पाटील म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकावर तलवारीने हल्ला? हैराण करणार कारण आलं समोर..

अहमदनगर | नगर सह्याद्री:- गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत २ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये डी जे मागे...

Politics News: लाडका दाजी बिबट्याच्या दहशतीखाली! आ. तनपुरेचे गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर..

Politics News: निवडणुकीच्या तोंडावर निळवंडे धरण कालव्यांची कामे थातूरमातूर कले आहे. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)...

नगर शहरात कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर शहर महापालिकेच्या वतीने शहर स्वच्छ राहावे, यासाठी स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम...

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...