spot_img
अहमदनगरAhmednagar Politics News :'बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते'; खा. नीलेश...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

spot_img

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:-
जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला फसवता येते, असा टोला माजी खा.सुजय विखे यांचे नाव न खा.नीलेश लंके यांनी लगावला. मी बोलबच्चन करणारा कार्यकर्ता नाही. शेतकर्‍यांचे, रस्त्याचे तसेच घोड, कुकडी आणि साकळाई प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खा. नीलेश लंके यांनी केले.

श्रीगोंदा तालुयातील कोळगाव येथील कोळगाव सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी खा.निलेश लंके, माजी आमदार राहुल जगताप, नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्याहस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.यावेळी काँग्रेस नेते घनश्याम शेलार, प्रतापसिंह पाचपुते, प्रेमकाका भोईटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे, उपसभापती मनिषा मगर, जालिंदर निंभोरे, शंकरराव लगड, राजेंद्र नलगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार राहुल जगताप म्हणाले, वाढत असलेल्या खासगीकरणात सहकार क्षेत्राचा मोठा आधार असून गाव पातळीवर काम करणार्‍या विविध सहकारी सेवा संस्था याच खर्‍या अर्थाने ग्रामीण विकासाचा कणा आहे.सहकारी संस्था बंद पडल्या तर शेतकर्‍यांना कोणी वाली राहणार नाही. कर्जाच्या प्रमाणात वसुली नगण्य असल्याने सहकारी संस्थासह जिल्हा बँक येणार्‍या काळात अडचणीत येण्याची शयता असल्याचे राजेंद्र नागवडे यांनी सांगितले. विकासाचे दृष्टी ठेवणारे नेते आणि कार्यकर्ते कोळगाव येथे असल्याने गावाची वाटचाल विकासाच्या दृष्टीने सुरू असल्याचे घनश्याम शेलार यांनी सांगितले.संस्थेचे चेअरमन हेमंत नलगे यांनी संस्थेचे ४०३० सभासद असून संस्थेच्या माध्यमातून ४५ कोटींचे कर्ज वाटप असल्याचे सांगितले.

संस्थेच्या कारभाराविषयीना माहिती दिली. यावेळी बाळासाहेब नलगे, दिनकर पंदरकर, सरपंच पुरुषोत्तम लगड, सुवर्णा पाचपुते, राजेंद्र म्हस्के, रामदास झेंडे, संतोष लगड यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या कारभारात योगदान देणार्‍या माजी चेअरमन, व्हा.चेअरमन यांच्यासह आजी-,माजी सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संचालक नितीन डूबल, सुनील दरेकर, भास्करराव वागस्कर, विलास नलगे, सुभाष शिंदे, योगेश भोईटे, उपसरपंच माया मेहेत्रे, मधुकर लगड, अमित लगड, योगेश मगर, विनायक लगड, संकेत नलगे, गोटू लगड, नंदकुमार लगड, मच्छिंद्र नलगे, विश्वास थोरात, विजय नलगे, सुनील काकडे यांच्यासह सर्व सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय नलगे, दादासाहेब निर्फळ यांनी केले. तर आभार संस्थच्या व्हा.चेअरमन लीलाबाई थोरात यांनी मानले.

‘साकळाई’साठी मंत्रालयात आंदोलन
निवडणुकीपर्यंत वातावरण टिकवायचे म्हणून साकळाई पाणी योजनेसाठी आंदोलन करणारा मी कार्यकर्ता नाही. साकळाई प्रश्नासाठी रस्ते बंद करून आपल्या माणसांची पिळवणूक करण्यापेक्षा मंत्रालयात आंदोलन करून मंत्रालय बंद करून योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खा.लंके यांनी यावेळी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Manoj Jarange Patil News :मनोज जरांगेंची इडी चौकशी करा कुणी केली मागणी? वाचा सविस्तर..

जालना | नगर सह्याद्री:- राज्यामध्ये मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. एकीकडे ओबीसीमधून...