spot_img
देशभारत आणि इराण यांच्यात मोठा करार! व्यापारासाठी पाकची गरज संपणार? नवा मार्ग...

भारत आणि इराण यांच्यात मोठा करार! व्यापारासाठी पाकची गरज संपणार? नवा मार्ग मोकळा, वाचा सविस्तर

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम
भारत आणि इराण यांच्यात सोमवारी व्यापारासाठी म्हणत्वपुर्ण करार झाला आहे. नव्या करारामुळे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापारासाठी नवा मार्ग मिळणार असून आता पाकिस्तानची गरज संपणार आहे.

भारत आणि इराण दोन दशकांपासून चाबहारवर काम करत आहेत. इराणमधील चाबहार येथील शहीद बेहेश्ती बंदरासाठी म्हणत्वपुर्ण करार झाला. करारासाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांना भारतातून इराणला गेले होते. करारामध्ये 10 वर्षांसाठी बंदर करारात घेण्यात आले आहे.

पूर्वी भारतातून अफगाणिस्तानात कोणताही माल पाठवायचा असेल तर तो पाकिस्तानमधून जावा लागत होता. मात्र, दोन्ही देशांमधील सीमावादामुळे भारत पाकिस्तानशिवाय दुसरा पर्याय शोधत होता. आता माल पाठवण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे.

यामध्ये चाबहार बंदर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या बंदराच्या मदतीने भारत इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अझरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपशी थेट व्यापार करू शकतो. या बंदरामुळे व्यापारासाठी नवा मार्ग मिळणार असून आता पाकिस्तानची गरज संपणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर जिल्ह्यातील ‘ते’ धरणं तुडूंब! कुठल्या धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- नगर जिल्ह्यातील शेती, व्यापार, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांना वरदान ठरलेल्या...

विधानसभेला जोरका झटका देणार, महायुतीचे काम नाही करणार?, नगच्या राजकारणात नेमकं शिजतंय काय?, कोणी केलं वक्तव्य..

Politics News: श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून येथे आरपीआयला उमेदवारी मिळावी. कारण गेल्या...

महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ठरवणार? ‘या’ तीन नेत्यांना दिले अधिकार

  Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची...

‘त्यांच्या’ मेंदूत ५० टक्के शेण! आमदार रोहित पवार यांचा ‘यांनी’ घेतला समाचार

Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची...