spot_img
अहमदनगरAhmadnagar Breaking: अर्ध्यावरती डाव ‘सोडला’! भीषण अपघात पत्नी ठार तर पती गंभीर

Ahmadnagar Breaking: अर्ध्यावरती डाव ‘सोडला’! भीषण अपघात पत्नी ठार तर पती गंभीर

spot_img

अहमदनगर । नगर सह्याद्री
जोडीदार हा वैवाहिक जीवनात महत्त्वापूर्ण घतक असतो. पती-पत्नीचं नातं म्हणजे एका रथाची दोन चाकं. यामध्ये एक चाक जरी डगमगलं तरी दुसरं चाक किंवा रथ पुढे जाऊ शकत नाही. याचप्रमाणे एका कटूंबाच्या रथाचे चाक डगमगल्याची धक्क्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. 

नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या अपघातात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास गुहा शिवारात घडली. पत्नी मिराबाई केशव केदार मयत झाल्या असून पती केशव मारूती केदार गंभीर जखमी झाले आहे. सोमवार दि. 6 मे रोजी श्रीरामपूरच्या दत्तनगर येथील केदार दाम्पत्य जागरण गोंधळाचा कार्यक्रमाला गुहा येथे आले होते.

जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते दुचाकीवर श्रीरामपूर येथे जाण्यास निघाले असता नगर-मनमाड महामार्गावरअज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत केदार दाम्पत्य रस्त्याच्या बाजूला दूरवर उडून पडले. यात मिराबाई केशव केदार यांचा उपचारापुर्वीच मृत्यु झाला तर केशव केदार हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...