spot_img
मनोरंजनआमिर खान बांधणार तिसऱ्यांदा लगीनगाठ?; तिसऱ्या विवाहच्या चर्चेबाबत आमिर खान काय म्हणाले?...

आमिर खान बांधणार तिसऱ्यांदा लगीनगाठ?; तिसऱ्या विवाहच्या चर्चेबाबत आमिर खान काय म्हणाले? पहा..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
बॉलीवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याच्या वैयक्तिक आयुष्याच्या चर्चेत नेहमीच एक खास स्थान असतो. 2021 मध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यापासून त्याच्या तिसऱ्या विवाहाच्या चर्चेला उधाण आले आहे. आमिर खानच्या तिसऱ्या विवाहाबाबतच्या अफवा समोर येत आहेत, परंतु या संदर्भात त्यांनी नुकतेच मौन सोडले आहे.

आमिर खानने यापूर्वी दोन लग्ने केली आहेत. 18 एप्रिल 1986 रोजी त्याने रीना दत्तासोबत लग्न केले, ज्यातून त्याला जुनैद आणि इरा नावाची दोन मुले आहेत. त्यानंतर, आमिर खानने किरण रावसोबत 2005 मध्ये दुसरे लग्न केले आणि त्यांना आझाद नावाचा मुलगा आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने तिसऱ्या विवाहावर स्पष्टीकरण दिले. “लग्न एक कॅनव्हास आहे, जो दोन लोक एकत्र रंगवतात,” असे आमिरने सांगितले. तथापि, त्याने स्पष्ट केले की, “माझ्या वयाच्या 59 वर्षांत, मला वाटत नाही की मी पुन्हा लग्न करू शकेन. सध्या माझ्या आयुष्यात अनेक नाती आहेत आणि मी माझ्या कुटुंबासोबत आनंदी आहे.” आमिर खान सध्या ‘तारे जमीन पर’ या लोकप्रिय चित्रपटाच्या सिक्वेलवर काम करत आहे, ज्याचे नाव ‘सीतारे जमीन पर’ असे असणार आहे. या चित्रपटात जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...