spot_img
ब्रेकिंगविधानसभेचा प्लान फिस्कटला! 29 ऑगस्टची बैठक स्थगित; मनोज जरांगे पाटील नेमकं काय...

विधानसभेचा प्लान फिस्कटला! 29 ऑगस्टची बैठक स्थगित; मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले? पहा

spot_img

Manoj Jarange Patil: सरकारने आरक्षण दिलं नाही तर विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करणारे मनोज जरांगेंनी अचानक आपली रणनीती बदलली आहे. अंतरवाली सराटी येथे होणारी (ता. 29) रोजीची नियोजित बैठक स्थगित करण्यात आली आहे.

सरकारने विधानसभेच्या निवडणुका चार महिने पुढे ढकलल्या आहेत. राज्यात कोणती आपत्ती नाही किंवा मोठे असे कारण नाही, तरीही काही कारण नसताना विधानसभा निवडणूक चार महिने पुढे ढकल्यामुळे विधानसभेच्या रणनीतीमध्ये बदल केल्याची माहिती मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मनोज जरांगे म्हणाले, अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज, बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार, लाठी हल्ला, राज्यात मराठा समाज, धनगर समाजाचे आरक्षणाकरिता होत असलेले आंदोलन, मोठे समाज सत्ताधारी सरकारच्या विरोधात आहेत. या घटनांची सत्ताधारी सरकारला भीती वाटत आहे, त्यामुळे सरकारने भीतीपोटी आणि निवडणुकीमध्ये फटका बसणार या कारणाने निवडणूक पुढे ढकलली आहे.

अंतरवाली सराटीत ता. 29 रोजी विधानसभा निवडणूक लढ्याची का समोरचे पाडायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. परंतु, सरकार आमच्या निर्णयाची वाट पाहत होते. आमची रणनिती त्यांना कळू नये, त्यांचे डाव यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही पण निवडणूक लांबली असल्याने ता. 29 रोजी आमचा निर्णय जाहीर करणार नाही असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Politics News:”मंत्री विखे पाटील यांच्या नियोजनामुळे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण”

Politics News: संगमनेर, निळवंडे कालव्यांचे पाणी आल्याने अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. पालक...

Ahmadnagar Politics:नगर जिल्ह्यात शिवसेनेला धक्का! तालुकाप्रमुख ‘कमळ’ हाती घेणार?

Ahmadnagar Politics: नगर जिल्ह्यात शिवसेनेला धक्का बसला आहे. जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) संजय काशिद...

साकळाई योजनेसाठी शेतकरी आक्रमक; कृती समितीचा पुढाऱ्यांवर हल्लाबोल, पाचपुते यांनीच केला घोळ…, शेलार, कार्ले, हराळ काय म्हणाले पहा…

'साकळाई'च्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य ओळखा कृती समितीचा खडकी येथे रास्तारोकोत इशारा | सिंचनभवनवर मोर्चा...

धक्कादायक! चुलत्या-पुतण्यावर धारधार हत्याराने सपासप वार! ‘ते’ कारण आलं सामोरे..

अहमदनगर। नगर सहयाद्री:- चुलत्या-पुतण्यावर धारधार हत्याराने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यात घडली आहे....