spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! मनोज जरांगे पाटील फिरले माघारी! नेमकं कारण काय?

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील फिरले माघारी! नेमकं कारण काय?

spot_img

जालना। नगर सह्याद्री-
प्रशासनाने अंबड तालुक्यात थेट संचारबंदीचे आदेश काढले असून त्यांच्या कट्टर समर्थकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील एकाही मराठ्याला त्रास होऊ नये म्हणून पुन्हा आंतरवाली सराटीच्या दिशेने माघारी फिरले आहे.

रविवार दि, २५ रोजी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. त्यांच्यामुळे अनेकांनी भाजप सोडले. राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीतर देवेंद्र फडणवीस चालवत आहे. अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे रद्द झाल्याने फडणवीसांचा आपल्यावर राग आहे. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर जाणार असल्याचे देखील म्हटले होते.

दरम्यान मुंबईतील सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील परिस्थिती बघून शहाणी भूमिका घ्यावी लागेल, एकाही मराठ्याला त्रास झाला नाही पाहिजे. आता आंतरवालीत जाऊन चर्चा करू त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे म्हणत माघारी फिरले असून सर्व मराठा बांधवानी संचारबंदी उठल्यावर आंतरवालीत यावे असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.

अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात थेट संचारबंदी लागू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यामुळे या परिसरात आता मराठा आंदोलकांना मनाई असणार आहे. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक एकत्रित येत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

मनोज जरांगे यांचे कट्टर समर्थक ताब्यात
मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सागर बंगल्यावर जाणार असा इशाराही दिला होता. त्यानंतर सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी पहाटे अचानक पोलीस पथक जालन्यात धडकले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक श्रीराम कुरणकर, शैलेंद्र पवार, बाळासाहेब इंगळे यांना ताब्यात घेतले आहे.

अंबड तालुक्यात एसटी बस पेटवली
मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले आहे. पोलिसांनी अंबड तालुक्यातील वाढता तणाव पाहता संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या परिसरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान जालन्यातील अंबड तालुक्यात मराठा आंदोलकांनी बस पेटवली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...