spot_img
अहमदनगरAhmednagar News: नगर मनमाड महामार्गावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको! काय केली मागणी पहाच..

Ahmednagar News: नगर मनमाड महामार्गावर शेतकर्‍यांचा रास्ता रोको! काय केली मागणी पहाच..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला आवर्तन सोडावे या मागणीसाठी शुक्रवार दि. १७ मे रोजी नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी पाण्याअभावी पिके करपण्याची भिती व्यक्त केली. शेतीच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांनी राहुरी येथे एकत्र येत नगर मनमाड महामार्ग अडवला. यावेळी आंदोलकांनी निवडणुका संपल्या त्यामुळे नेते मंडळी आता गावांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा दावा केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले.

या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी सरकारवर रोष व्यक्त केला. जनावरांना पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शेतक-यांना सरकारने वार्‍यावर सोडल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नवरात्रात वासुंदे येथे जोगेश्वरी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह

नवरात्रात वासुंदे येथे जोगेश्वरी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह जालिंदर वाबळे यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील वासुंदे येथे...

भूमिपुत्रांचे उपोषण सुटले; खासदार नीलेश लंके यांची मध्यस्थी यशस्वी

पारनेर । नगर सहयाद्री तालुक्याच्या पठार भागाला एक टीएमसी पाणी मिळावे, कान्हूर पठार, पुणेवाडी,...

चिमुकल्यासह महिलेने ‘गोदावरी’ नदीमध्ये उडी मारली

Maharashtra News: यंदाच्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे नदया ओसंडून वाहत आहे. सध्या जायकवाडी धरणातून...

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अॅक्सेस स्वतःकडे घेतले, डॉक्टर महिलेसोबत नको तोच प्रकार घडला? २८ वर्षांच्या तरुणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर । नगर सहयाद्री:- डॉक्टर असलेल्या महिलेच्या घरातील हॉलमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अॅक्सेस तरुणाने...