spot_img
अहमदनगरब्रेकिंग: मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मोठी मागणी! म्हणाले, 'मुस्लीम समाजाला..'

ब्रेकिंग: मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मोठी मागणी! म्हणाले, ‘मुस्लीम समाजाला..’

spot_img

जालना। नगर सहयाद्री-
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे यांनी या पत्रकार परिषदेत सरकारकडे मोठी मागणी केली आहे. राज्यात काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण सोडले. राज्य शासनाने त्यांना इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे लेखी आश्वासन दिले. दरम्यान, राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगेही मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत.

जरांगे पाटील म्हणाले, माळी समाजाला व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिले असेल तर आम्हीदेखील तुम्हाला आमचे व्यवसाय दाखवतो. ते बागायती शेती करतात म्हणून त्यांना आरक्षण देण्यात आलं. आम्ही देखील शेतकरी मराठा म्हणून आमचा व्यवसाय दाखवतो. आम्हाला देखील व्यवसायाच्या आधारावर आरक्षण देण्यात यावे.

तसेच काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी सरकारी नोंदी निघाल्या आहेत. लिंगायत, मारवाडी, ब्राह्मण, लोहार या समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी निघाल्या आहेत. सरकारदरबारी हे कुणबी शेतकरी असल्याच्या नोंदी निघाल्या असतील तर मुस्लिमांनाही ओबीसीतूनच आरक्षण मिळायला हवं अशी मागणी जरांगे यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...