spot_img
ब्रेकिंगVoting: ओळखपत्र नाही तरी करा मतदान? 'हे' पुरावे धरले जातात ग्राह्य, पहा...

Voting: ओळखपत्र नाही तरी करा मतदान? ‘हे’ पुरावे धरले जातात ग्राह्य, पहा यादी..

spot_img

नगर सहयाद्री वेब टीम-
मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळख जवळ नसल्यास अन्य 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही माहिती दिली आहे.

मतदारांना छायाचित्र असलेलं ओळखपत्र अनिवार्य आहे. मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी ते सादर करावं लागणार आहे. जे मतदार असं ओळखपत्र सादर करू शकनार नाहीत, त्यांना निवडणूक निवडणूक आयोगाने सांगितलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागणार आहे. तो ग्राह्य धरण्यात येणार आहे.

हे बारा पुरावे कोणते आहेत?
वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पारपत्र (पासपोर्ट), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या (Identity Proofs For Voting) नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धारदार हत्याराने तरूणावर हल्ला! नगरसेवक विजू पठारे यांच्या ऑफीसवर नेमकं काय घडलं?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- वेल्डिंगचे काम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडके, लोखंडी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जीवनातील अत्यंत सुंदर दिवस?, काय घडणार….

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी...

सरकारच्या घोषणा ‘लाडक्या खुर्चीसाठी’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल | नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर | नगर सह्याद्री:- सध्या राज्यात...

‘परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी’

अमदनगरमध्ये ९१६ हेक्टरवर नुकसान मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या परतीच्या पावासाने मोठं...