spot_img
ब्रेकिंग'मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका'

‘मराठा समाजाला झुलवत ठेऊन राजकारणाची पोळी भाजू नका’

spot_img

आमदार राजेंद्र राऊतांचा मनोज जरांगेंना टोला
सोलापूर | नगर सह्याद्री

स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी कोणीही मराठा समाजाला झुलवत ठेवू नये आणि महाराष्ट्राचा मणिपूर करू नये असं वक्तव्य बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून केलं. सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर अंधारात भूमिका न मांडता विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन बोलवून त्यात आपली भूमिका स्पष्ट करावी. जर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं असेल तर तसे सांगावे. मात्र समाजाला झुलवणे बंद करावे असा टोला आमदार राऊत यांनी लगावला.

सगळ्या आमदारांकडून पत्र घ्या आणि विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करा, बाकी काहीही बोलू नका असा टोलाही त्यांनी मनोज जरांगे यांना लगावला. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे.
मी बार्शीचा अपक्ष आमदार असून माझे विरोधक महाविकास आघाडीत असल्याने गेली अडीच वर्ष मी विरोधात होतो. सत्ता आल्यानंतर मी एकनाथ शिंदें सोबत असलो तरी वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी मराठा आंदोलनात काम केलेली आहे असं राजेंद्र राऊत म्हणाले. कोणीही मराठा समाजाचा गैरवापर करू नये. मराठा समाजाची फसवणूक न करता योग्य मार्गाने न्याय द्या असा इशाराही त्यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता दिला. मी मराठा समाजाबद्दल एखादा विचार मांडला तर कोणाला राग यायचे काय कारण? जरांगे कोणती बाजू घेतात ते सर्वांना माहीत आहेत. आता मी माझी बाजू स्पष्ट केलेली असून आता त्यांनी आमदारांकडून विशेष अधिवेशनासाठी पत्र घ्यावीत असा आवाहन ही राऊत यांनी केले.
सर्वच पक्षांनी जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला तर सरळ पाच कोटी मराठ्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवरच बहिष्कार घालावा अशी ही मागणी राजेंद्र राऊत यांनी केली.

मराठा विरोधी भूमिका मांडणार्‍याच्या विरोधात मतदान करा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भात जे पक्ष आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत त्यांच्या विरोधात सर्व मराठा समाजाने मतदान करावे असे आवाहन राऊत यांनी केले. यानंतरच प्रत्येक पक्षाची अंधारातील भूमिका आणि खरी भूमिका उघड होऊन दूध का दूध व पाणी का पाणी होऊन जाईल. मी हेच फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजित पवार यांच्यासह शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना पत्र लिहून मागणी केलेली आहे. बहुतांश सर्व पक्षांना आणि आमदारांना माझी पत्र गेली असून आता त्यांनी विधानसभा अध्यक्षांना विशेष अधिवेशन घेण्यासाठी पत्र पाठवायचे आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...