spot_img
अहमदनगरAhmednagar: हिवरेबाजार शिवारात 'धक्कादायक' प्रकार? शेतीचा वादातून पती-पत्नीला..

Ahmednagar: हिवरेबाजार शिवारात ‘धक्कादायक’ प्रकार? शेतीचा वादातून पती-पत्नीला..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
शेतीच्या वादातून पती- पत्नीला कुर्हाड, काठीने मारहाण केल्याची घटना हिवरेबाजार (ता. नगर) शिवारात घडली. मारहाणीत सतिष रामदास ठाणगे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांनी उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करण संजय ठाणगे, संजय विठ्ठल ठाणगे, नितीन विठ्ठल ठाणगे, सुलभा संजय ठाणगे, अंबिका नितीन ठाणगे (सर्व रा. हिवरेबाजार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. २९ एप्रिल रोजी सायंकाळी सतिष त्यांच्या हिवरेबाजार शिवारातील शेतात ट्रॅटरच्या सहाय्याने नांगरट करत असताना तेथे करण आला व म्हणाला, तू येथे नांगरणी का करतो’, तेव्हा सतिष त्याला म्हणाले, क्षेत्र मी खरेदी केले आहे’, याचा राग आल्याने करण याने इतरांना तेथे बोलून घेतले.

त्यांनी सर्वांनी सतिष यांना काठी व कुर्हाडीने मारहाण करून जखमी केले. भांडणाचा आवाज ऐकून सतिष यांची पत्नी विशाखा तेथे आली असता सुलभा व अंबिका यांनी तिला मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.जखमी सतिष यांनी दिलेल्या जबाबावरून ३० एप्रिल रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार जंबे अधिक तपास करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...