spot_img
अहमदनगरज्याच्या नावातच जय त्यांचा विजय नक्की ! शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात खा.श्रीकांत...

ज्याच्या नावातच जय त्यांचा विजय नक्की ! शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात खा.श्रीकांत शिंदेंचे खा.सुजय विखेंना बळ

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : जिल्ह्याच्या विकासात विखे पाटील परिवाराचे ५० वर्षांपासून मोठे योगदान आहे. त्यामुळेच त्यांची चौथी पिढी आज सत्तेत आहे. विकासाची परंपरा असेलेले सुजय विखे पाटील हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. त्यांच्या नावातच ‘जय’ आहे त्यामुळे त्यांचा विजय नक्की आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. ते नगर येथील शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते.

नगर येथील माऊली सभागृह येथे शिवसेना कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादासाहेब भुसे, शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे, महायुतीचे लोकसभेचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, शिवसेनेच्या स्थानिक महिला नेत्या शबनम इनामदार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा विजय नक्की असून, ही निवडणूक व्यक्तीची निवडणूक नसून विचारांची निवडणूक आहे. यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने महायुतीच्या उमेदवाला निवडून आणण्यासाठी मतभेत विसरून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे असे शिंदे म्हणाले. शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार करत असल्याचे सांगितले.

मंत्री दादासाहेब भुसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले, ही निवडणूक महाराष्ट्र आणि देशासाठी महत्वाची आहे. प्रत्येक उमेदवार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करणार आहे. यामुळे डॉ. सुजय विखे पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावेत असे ते म्हणाले.

मी फक्त तुम्हाला विकास देऊ शकतो : खा. विखे
या मेळाव्यात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराचा बिगुल वाजला असून सुजय विखे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, मी तुम्हाला फक्त विकास आणि विकासच देऊ शकतो. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत. यामुळे जिल्ह्याचा विकास हेच माझे एकमेव लक्ष असून ते मी अविरत करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विखे पाटील यांनी आपल्या भाषणात देशाच्या प्रगतीचा उल्लेख करत ही निवडणूक व्यक्तीची निवडणूक नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठीची निवडणूक आहे. यामुळे सर्वांनी आपले मदभेद विसरून महायुतीच्या कामाला लागावे असे आवाहन केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...