spot_img
ब्रेकिंगराज्यात दिवसभर कोसळणार पाऊस! 'या' जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात दिवसभर कोसळणार पाऊस! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

spot_img

Rain update:मध्य भारतातील कमी दाबाच्या क्षेत्राने बाष्प खेचून नेल्याने राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोणत्याही भागात जोरदार पाऊस झाला नाही. मात्र आजपासून पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत असून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरणासह पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी मशागतीचे कामे लवकर आटोपून घ्यावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात देखील आज शनिवारी आणि उद्या रविवारी जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात रिमझिम पावसाची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...