spot_img
अहमदनगर'माझी वसुंधरा ४.० अभियानात मनपाला सलग दुसर्‍या वर्षी पुरस्कार'

‘माझी वसुंधरा ४.० अभियानात मनपाला सलग दुसर्‍या वर्षी पुरस्कार’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:
माझी वसुंधरा ४.० अभियानात अहमदनगर महापालिकेला सलग दुसर्‍या वर्षी सहा कोटींचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. राज्यातील ड वर्ग असणार्‍या १९ महापालिकेतील दुसरा क्रमांक पटकावणारी अहमदनगर महापालिका ठरली आहे.

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ४.० अभियानांतर्गत घेतलेल्या अभियानात नगर महानगरपालिकेला या वर्षीही राज्यात दुसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात पनवेल महानगरपालिकेला प्रथम व नगरला ६ कोटी रुपयांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. यशवंत डांगे यांनी मनपा मध्ये उपायुक्त पदी असताना वसुंधरा अभियानात विशेष मेहनत घेऊन उपाययोजना केल्या त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचरा मुक्त शहराला थ्री स्टार मानांकन व हागणदारी मुक्त शहर ओडीएफ++ चे प्रमाणपत्र सातत्य ठेवून प्राप्त केले.

आजवर मनपाला माझी वसुंधरा अभियान २.० प्रथम क्रमांकाची उंच उडी मध्ये १.५० कोटी माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये ड वर्ग महापालिकेत द्वितीय ६ कोटी आणि यंदाच्या वर्षी माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये ड वर्ग महापालिकेत द्वितीय ६ कोटी चे या व्यतिरिक्त शहर सौंदर्यकरणांमध्ये ५ कोटींचे असे एकूण १८.५ कोटींचे बक्षीस मिळवून दिले. केलेल्या कामाचे चीज ते आयुक्त पदावर कार्यरत असताना झाले. नागरिकांच्या व महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे महानगरपालिका ही कामगिरी करू शकली, अशी भावना आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केली.

माझी वसुंधरा अभियानात मागील वर्षीही महानगरपालिकेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता. यंदाही महानगरपालिकेने चांगली कामगिरी करत आपले स्थान कायम राखले आहे. भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या घटकात शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या. शहरात या विषयी विविध अभियान राबवून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विशेषतः घनकचरा व्यवस्थापन विभाग व सफाई कामगारांनी घेतलेल्या मेहनतीमुळे महानगरपालिका ही कामगिरी करू शकली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य; माझा लढा तोपर्यंत संपणार नाही…, नेमकं काय म्हणाल्या..

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) नेत्या सुप्रिया सुळे यांनी, “जोपर्यंत त्यांना...

नगरमध्ये कोतकर-जगताप संघर्ष नव्या वळणावर!

राजकीय ताकद कोणामुळे कोणाला अन् कोणाला मोजावी लागली किंमत! महापौर पदानंतर कोतकरांना मिळाल्या होत्या...

Raj Thackeray : लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरेंचे मोठे विधान.. नेमकं काय म्हणाले पहा..

अमरावती / नगर सह्याद्री - महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे. लाडकी...

Politics News: मोदी सरकार औट घटकेचे; जयंत पाटील सरकारवर बरसले? राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज ‘या’ गावात!

Politics News: मोदींचे सरकार औट घटकेचे असून येत्या पाच ते सहा महिन्यांत नितीश कुमार...