spot_img
ब्रेकिंगमनोज जरांगे पाटलांनी विधानसभेसाठी थोपाटले दंड! किती मतदारसंघात उमेदवार देणार? वाचा सविस्तर...

मनोज जरांगे पाटलांनी विधानसभेसाठी थोपाटले दंड! किती मतदारसंघात उमेदवार देणार? वाचा सविस्तर…

spot_img

Manoj Jarange Patil:-मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही राज्य सरकारने मार्गी लावला नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी आपले दंड थोपटले असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. 7 ऑगस्टपासून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मराठा समाजासह इतर समाजातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय आणि तालुका निहाय इच्छुकांनी आपली माहिती अंतरवाली सराटी येथे आणून द्यायची आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील येत्या विधानसभा निवडणुकीत 150 ते 200 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. तसेच 7 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या शांतता रॅलीमध्ये सहभागी होऊन दौरा करणार आहेत.13 ऑगस्टपासून इच्छुकांनी दिलेल्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. इच्छुकांना स्वतःच्या परिचयपत्रासह मतदारसंघातील जातीनिहाय मतदारांची माहिती सादर करावी लागेल.

7 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे अर्ज स्वीकारला जाणार आहे. अर्जाच्या छाननीसाठी कोअर समिती स्थापन केली जाणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे उमेदवारांची मुलाखत घेऊन अंतिम निवड करतील. 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान या प्रक्रियेची पूर्णता होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबीमध्ये आरक्षण दिल्यास, निवडणुकीच्या तयारीऐवजी जल्लोषाची तयारी करून राज्यभर जल्लोष केला जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे

.दरम्यान, प्रकृती बरी नसतानाही मनोज जरांगे पाटील गुरुवारी मध्यरात्री 2 वाजता पुण्यात दाखल झाले आहेत. आज ते पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मनोज जरांगे यांच्यासह दोन जणांविरोधात पुणे सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. यानंतर त्यांच्या वकिलांनी ते 2 ऑगस्ट रोजी हजर राहतील, असा अर्ज कोर्टाला दिला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...