spot_img
अहमदनगरमराठा आरक्षण: उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; खासगी रुग्णालयात दाखल

मराठा आरक्षण: उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली; खासगी रुग्णालयात दाखल

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

मराठा आरक्षणासाठी नगर तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नगरच्या तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. गोरख दळवी, अमोल हुंबे, संतोष अजबे, नवनाथ काळे यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांची सर्वांची प्रकृती तिसर्‍या दिवशी रात्री ११ वाजता खालावल्याने सलाईन लावण्यात आले होते.

दरम्यान, यातील नवनाथ काळे या तरूणाची प्रकृती गुरुवारी सकाळी आणखी खालावली असल्याने त्यांना रूग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काळे यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ डॉटरांशी संपर्क केला.

काही वेळात रूग्णवाहिका उपोषणस्थळी दाखल झाली. त्या रुग्णवाहिकेतून नवनाथ काळे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची शुगर कमी झाली असून ब्लड प्रेशर वाढला असल्याची माहिती आहे.

गावागावात साखळी उपोषण

गेल्या नऊ दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील गावागावात पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावागावात साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. रस्तारोको, गावबंद, उपोषणाची हाक सकल मराठा समाजाकडून दिली जात आहे. दरम्यान इतर समाज बांधवांकडूनही गावोगावच्या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...