spot_img
अहमदनगर"पोस्टर बॉय आडवा आला तर सरळ करा" आ. राणे नेमकं काय म्हणाले?...

“पोस्टर बॉय आडवा आला तर सरळ करा” आ. राणे नेमकं काय म्हणाले? पहा..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
यापुढील काळामध्ये हिंदूंनी अन्याय सहन करू नका. अन्याय करणाऱ्यांचे हात आणि पाय उखडून टाका, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही कारण आता सरकार हिंदूंची आहे आणि हा देश हिंदूंचा आहे, असे आवाहन आ. नितेश राणे यांनी केले.

कर्जत शहरातील हनुमान मंदिर व सिद्धटेक येथील गणपती मंदिराच्या परिसरामध्ये अन्य धर्मियांनी केलेले अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी कर्जत शहरामध्ये हिंदू आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अक्काबाई मंदिरापासून हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली.

यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने महिला युवक व पुरुष सहभागी झाले होते. ग्रामदैवत गोधड महाराज मंदिरामध्ये दर्शन घेऊन कापरेवाडी वेस येथे अतिक्रमण केलेल्या हनुमान मंदिर परिसरामध्ये मोर्चा नेण्यात आला. त्यावेळी चांगलाच तणाव त्याठिकाणी निर्माण झाला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. मोर्चा बाजारतळ येथे गेल्यावर त्याचे जाहीर सभेमध्ये रूपांतर झाले.

सभेत राणे म्हणाले, हा देश हिंदूंचा आहे. या देशावर सत्ता ही हिंदूचीच राहील आणि या देशावर हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. याचप्रमाणे पुढील काळामध्ये देखील राहावे लागणार आहे. अन्यथा हे हिरवे साप कधीही त्यांचा विळखा सर्व हिंदूंना घालून आपले गाव परिसर आणि देश यामधून आपल्याला बाहेर काढण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत.

यावेळी आ. राणे यांनी नाव न घेता आ. रोहित पवार यांच्यावर टीका केली. अधिकाऱ्यांनी पोस्टर बॉय याचे ऐकून त्या धर्मियांना विनाकारण संरक्षण देऊ नका. सरकार देशात आणि राज्यात भाजपचे आहे हे विसरू नका, जर पुढील काही दिवसांमध्ये हे अतिक्रमण काढले नाही तर मी स्वतः याठिकाणी येऊन बुलडोझर लावून हे अतिक्रमण दूर दूर करेल. त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहील. आणि तो पोस्टर बॉय आडवा आला तर त्याला देखील सरळ करू, असा इशारा राणे यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Politics News: राष्ट्रवादीचे संपत बारस्कर आंदोलन छेडणार! कारण काय? वाचा सविस्तर

Ahmednagar Politics News; सावेडी उपनगर परिसरात बंधन लॉन ते राजवीर चौक ते भिस्तबाग महाल...

Ahmednagar Accident News: अहमदनगरमध्ये भीषण अपघात? तीन ठार; दोन गंभीर..

Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाता लुक्यातील पारगाव रस्त्यावर एक ते दीड तासाच्या अंतराने...

Pitru Paksha: पितृपक्षात श्राद्ध विधी करणे गरजेचा का आहे? महाभारताच्या १३ व्या अध्यायात नेमकं काय? जाणून घ्या

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध, तर्पण...

Ahmednagar Crime: खळबळजनक! पोलिसांना मध्यस्थी भोवली! आरोपींकडून मारहाण; कुठे घडला प्रकार?

Ahmednagar Crime: कोपरगाव तहसील कार्यालयात शेजारी असलेल्या लॉकपगार्ड येथे आरोपी आपापसात भांडत करत असतांना...