spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! मद्यधुंद प्रवाशाने स्टेअरिंग खेचलं, बसने 9 जणांना उडवलं

धक्कादायक! मद्यधुंद प्रवाशाने स्टेअरिंग खेचलं, बसने 9 जणांना उडवलं

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
मुंबईच्या लालबाग परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका प्रवाशाने धावत्या बेस्ट बसचं स्टेअरिंग खेचलं. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बसने रस्त्यावरून जात असलेल्या 9 जणांना चिरडलं. या थरारक घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

जखमींवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अपघातानंतर लालबाग परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. याप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट बसची ६६ नंबरची बस भाटियाबाग येथून राणी लक्ष्मीबाई चौकाकडे निघाली होती. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बस लालबागमधील गणेश टॉकीज परिसरात आली. यावेळी एका मद्यधुंद प्रवाशाने क्षुल्लक कारणांवरून चालकासोबत वाद घातला.

वाद इतका विकोपाला गेला, की हा प्रवासी चालकाच्या कॅबिनमध्ये घुसला. त्याने थेट बसचे स्टेअरिंग खेचले. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 9 जणांना चिरडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...