spot_img
ब्रेकिंग..तर पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार; जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

..तर पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार; जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

spot_img

Manoj Jarange Patil News: जर सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल, चारही बाजूंनी मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असेल आणि हक्काचं आरक्षण देण्यास टाळाटाळ करत असेल, तर आम्हाला पाडापाडीचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. तसेच २९ तारखेला या मुद्द्यावर निर्णय होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढे बोलतांना जरांगे पाटील म्हणाले, “गर्वाला कधी वाढ नसते, कधी ना कधी संपतोच. लोकसभेला जे झालं त्यापेक्षा विधानसभेत ५ पटीने होईल. मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व सरकारला आला आहे. मराठा कुणबी एकच आहे,

मराठ्यांवर जाणूनबुजून अन्याय केला जात आहे. सारथीच्या कोणत्या सवलती आम्हाला कामी येतात? सगळ्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं, मग फी का घेतली जाते? मी पावत्या देतो. अर्धवट गुंतवणूक ठेवली जाते. प्रवेशासाठी पैसे घेतले जातात. त्यामुळे सरकारवर सर्व समाजातील लोक नाराज झाले आहेत,” असं त्यांनी सांगितलं.शरद पवार यांच्या मतांचा विचार करण्यापेक्षा, माझं मन, माझे विचार काय सांगत आहेत, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

मराठ्यांचे कल्याण व्हावं, तसंच लिंगायत, धनगर, मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवं, ही प्रामाणिक भावना आहे. बारा बलुतेदारांची वेगळ्या प्रवर्गाची मागणी आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. परिणाम काहीही झाले, सर्व जातीधर्माला आरक्षण दिलं पाहिजे. वेळ पडली तर सर्वांना एकत्र येत विधानसभेत जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, लोकांचा आक्रोश आणि संतापाची लाट कशासाठी आहे, इतका जोर का धरला जात आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे.मराठ्यांच्या आरक्षणावर समाधानकारक तोडगा कसा काढायचा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, हे सरकारला कळायला हवं. उगाच डिवचण्याचा प्रयत्न केला तर परिणाम वेगळ्या दिशेला जातील. विधानसभेचं दार आतून बंद केलं आहे, ते उघडावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...