spot_img
अहमदनगरनगरमध्ये ‘एक मराठा, लाख मराठा’ चा होणार जयघोष! मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत...

नगरमध्ये ‘एक मराठा, लाख मराठा’ चा होणार जयघोष! मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत ‘या’ तारखेला निघणार रॅली

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याला महाराष्ट्रभर जोरदार प्रतिसाद मिळत आहे. येत्या सोमवारी (१२ ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील नगर शहरात येणार असून, नगरमध्ये भव्य शांतता रॅली आयोजित करण्यात आली आहे. केडगाव येथे या रॅलीचे स्वागत होणार असून, माळीवाडा बस स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली सुरू होईल. रॅली नगर शहरात सुमारे साडेसहा किलोमीटर अंतर पार करून चौपाटी कारंजा येथे सांगता होणार आहे.

सुमारे पाच हजार स्वयंसेवक नियोजन व व्यवस्था करत आहेत. नगर जिल्ह्यासह शेजारील बीड, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातून लाखो समाजबांधव शहराच्या रॅलीत सहभागी होणार आहेत.गरच्या अखंड समाजाच्या वतीने बेलवंडी फाटा येथे जिल्ह्यात त्यांचे स्वागत होईल. तेथून सुमारे चारशे चारचाकी व एक हजार दुचाकी त्यांच्या यात्रेत सहभागी होतील.

नगरकडे येताना सुपा येथेही स्वागत होईल व तेथून केडगाव येथे शहरात स्वागत होईल.केडगाव येथे स्वागत-कायनेटिक चौक-सक्कर चौक, माळीवाडा बसस्थानक मार्केट यार्ड चौक, माळीवाडा वेस, पंचपीर चावडी, आशा टॉकीज चौक, माणिक चौक, कापड बाजार, तेलिसुंट, चितळे रोड मार्गे चौपाटी कारंजा येथे येणार आहे. केडगाव येथे नेमाने इस्टेट, कल्याण रस्त्यावर फटाका मार्केट भरणारी जागा, शहरात क्लेरा ब्रूस मैदान न्यू आर्टस् कॉलेज,सावेडीत सारडा कॉलेज अशा विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...