spot_img
अहमदनगरAhmednagar : 'मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ'

Ahmednagar : ‘मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ’

spot_img

श्रीगोंदा । नगर सहयाद्री
पाणीदार तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील पाणी व ओढे, नाले, कॅनल आटल्याने मेंढपाळांनी आपला मुक्काम हलविलेला आहे. पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मेंढपाळ आपले मेंढ्या त्यांचे कोकरे, कुटुंबाचे सदस्यांचे जेवणाचे साहित्य, पाळीव कुत्रे, कोंबड्या, त्यांची लहान मुलं घोड्यांच्या पाठीवर बसून चारा आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत फिरत असल्याची स्थिती आहे.

पावसाळा संपताच घरातील वयोवृद्ध व्यक्तींचे जेवण पाण्याची सोय करून मेंढपाळ कुटुंब मेंढ्यांच्या चारा आणि पाण्याच्या शोधात शेकडो मैल पायपीट करत जातात. परंतु यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घराचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे. कारण मेंढ्या जगविण्यासाठी ज्या भागात पाऊस पडला आहे. त्या भागात या मेंढपाळांना चार्‍याच्या शोधात निघावे लागले आहे.

दरम्यान सध्याला घराजवळ येऊन पुन्हा घराच्यांना विसरून चारा पाण्याच्या शोधात जावे लागत असल्याने घरातील वयोवृद्ध व्यक्तींना गहिवरून आले असल्याचे चित्र पाहायला मिळते. परंतु कुटुंबीयांपेक्षा मुक्या प्राण्यांचा जीव महत्त्वाचा माणूस घोड्याच्या पाठीवर संसार उपयोगी साहित्य लादुन ते शेकडो मैलाच्या प्रवासासाठी निघाले आहेत.

यावर्षीचे सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा न करता राणावाणांमध्ये साजरा करण्याची वेळ मेंढपाळांवर आली आहे. चालू वर्षी सुरुवातीलाच पावसाळ्यात पहिल्यापासूनच पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्न गंभीर झाला. तसेच मेंढ्यांच्या चार्‍यासाठी व पाण्यासाठी भटकंती करत असताना मेंढपाळांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. मेंढपाळ सध्या घराचा रस्ता धरत असतानाच गावाकडेही चार्‍याचा प्रश्न गंभीर बनल्याने ज्या भागात पाणी व चारा उपलब्ध आहे. त्या भागाकडे मेंढपाळ कुटुंबीयांनी आपला मोर्चा वळविला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ
पावसाने सुरुवातीपासूनच दडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटुंबीयांवर पुन्हा घरचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे, कारण मेंढ्या जगविण्यासाठी ज्या भागात चारा व पाणी उपलब्ध आहे. त्या भागात या मेंढपाळांना चार्‍याच्या शोधात निघावे लागत आहे. पाळीव जनावरांनाही सध्या पाणी व चारा टंचाई भासत आहे. आम्ही दरवर्षी श्रीगोंदा तालुक्यामध्ये चारणीसाठी येत असतो परंतु यावर्षी पावसाने दडी मारल्याने परिसरात पाणी नसल्याने आम्ही आमचा मुक्काम दुसर्‍या ठिकाणी हलवला आहे.
– धोंडीबा सरक (मेंढपाळ)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

MLA Sangram Jagtap: खुशखबर! नगरमध्ये २० इलेट्रिक बस धावणार; आमदार जगताप काय म्हणाले पहा…

अहमदनगर | नगर सह्याद्री नगर एमआयडीसी मधील कामगारांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उद्योजकांनी बस...

Politics News: पारनेरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी! ‘यांनी’ दिला मोठा इशारा

Politics News: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर मतदारसंघात (Parner-Nagar Matadarasaṅgha) महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण...

Badlapur encounter case: बदलापूर एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; अक्षय शिंदेवर गंभीर गुन्हा दाखल

मुंबई | नगर सह्याद्री:- बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता. २३) पोलीस...

Ahmednagar Rain Update: परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले!

नगर, पारनेर, राहुरीत दमदार पाऊस | सरासरी १२९ मिलीमीटर पावसाची नोंद अहमदनगर | नगर सह्याद्री:- परतीच्या...