spot_img
अहमदनगरपाण्यात उतरलेल्या विजेच्या तारांचा दोन बैलांना स्पर्श, यानंतर जे घडलं ते धक्कादायक!...

पाण्यात उतरलेल्या विजेच्या तारांचा दोन बैलांना स्पर्श, यानंतर जे घडलं ते धक्कादायक! बैलगाडीमध्ये होते पती-पत्नी..

spot_img

जामखेड
शेतातील काम संपल्यानंतर बैलगाडीतून संध्याकाळी पती-पत्नी घरी परतत होते. यावेळी अचानक विद्युतपोलचा वीजप्रवाह रस्त्यावरील पाण्यात उतरला होता. याचा दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या बैलगाडीच्या बैलांना विजेचा धक्का बसल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. मात्र प्रसंगावधान राखून पती व पत्नी यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या आपघातुन बालंबाल बचावले आहे.

गुरुवार दि २० जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील वाघा गावातील शेतकरी सुखदेव बबन बारस्कर हे आपल्या पत्नीसह बैलगाडीतून शेतात गेले होते. दिवसभर शेतातील काम ओटपुन संध्याकाळी आपल्या घरी परतत होते. यावेळी पाऊस देखील सुरु होता. यावेळी बैलगाडीतून आपल्या घरी परतत असताना वाघा गावात एका लाईटच्या पोलचा वीज प्रवाह पावसाने रस्त्यावर साठलेल्या पाण्यात उतरला होता.

दरम्यान बैलगाडी तेथुन जात असतानाच बैलांना विजेचा धक्का बसला. त्यामध्ये दोन्हीही बैलाचा जागीच मृत्यू झाला तर प्रसंगावधान राखून पती पत्नी यांनी बैलगाडीतून बाहेर उड्या मारल्याने ते या आपघातुन बालंबाल बचावले. सदर घटनेमध्ये शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने घटनेचा पंचनामा करुन शेतकर्‍यास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थानांकडून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुन्हा ताबेमारी? ‘ते’ आले आन सुरु झाले..; जमिनीचा ताबा घेण्यासाठी सराईत गुंडांकडून कटूंबावर हल्ला

Ahmednagar Crime News: नेवासा तालुक्यातील वरखेड येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी सराईत गुंडांकडून लोखंडी रॉड...

Ahmednagar Crime News: भर रस्त्यात काढली विद्यार्थीनीची छेड? गुन्हा दाखल

अहमदनगर । नगर सहयाद्री:- क्लासवरून घरी जात असताना विद्यार्थीनीचा पाठलाग करून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल...

राज्यात विधानसभेचे बिगुल वाजणार! कधी होणार घोषणा? निवडणूक आयोगाने…

Vidhan Sabha Election:आगामी विधानसभेचे वारे राज्यात वाहण्यास सुरवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात दणदणीत...

आजचे राशी भविष्य ‘या’ राशींसाठी व्यावसायिकांना आजचा दिवस…

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशिब फळफळेल...