spot_img
अहमदनगरनातेवाईकांसोबत गेला पण क्षणात दिसेनासा झाला! १७ वर्षांच्या युवकासोबत हंगा नदीवर काय...

नातेवाईकांसोबत गेला पण क्षणात दिसेनासा झाला! १७ वर्षांच्या युवकासोबत हंगा नदीवर काय घडलं?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
बेलवंडी येथील गावठाणलगतच्या पोलीस दूरक्षेत्राच्या जवळ असणाऱ्या हंगा नदीच्या पात्रात बुडून साई संतोष पवार (वय १७) या युवकाचा मृत्यू झाला. यावेळी गावकऱ्यांसह रायगव्हाणच्या पथकाने सात तासांच्या प्रयत्नानंतर बुडालेल्या तरुणाचा नदीतून मृतदेह काढला बाहेर काढला.

बेलवंडी गावातील हंगा नदीच्या पात्रात पवार हा आई व इतर नातेवाईकांसमवेत कपडे धुण्यासाठी गेला होता. नदीच्या पात्रात असणारी गणपती बाप्पाची मूर्ती काढण्यासाठी तो पात्रात उतरला. पण पाण्याचा अंदाज न घेता तो गणपती बाप्पाच्या मूर्तीपर्यंत जाऊ लागला. यावेळी पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. यावेळी सोबत असणारा त्याचा मोठा भाऊ यश पवार व इतर नातेवाईक यांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. तसेच शेजारचे तरुण मदतीला धावले. पण काही क्षणात साई दिसेनासा झाला.

अनेक तासांच्या प्रयत्नांनंतरही पवार याचा शोध लागला नाही. अखेर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, उत्तम डाके, डॉ. अशोक शेलार व ग्रामस्थांनी रायगव्हान येथील अनिल पठारे यांच्याशी संपर्क साधला. पठारे व त्यांचे सहकारी काळू निकम, सोन्या साळुंखे, राहुल साळुंखे, राजेंद्र बर्डे, विजय बर्डे, मंगेश जाधव, संतोष जाधव, गणेश सूर्यवंशी, राजू गायकवाड यांनी शोध मोहीम राबवली.

यावेळी मुसळधार पाऊस आणि वीज नसल्याने मोहिमेत अडचण आली. अखेर सात तासांच्या प्रयत्नानंतर पवार याचा मृतदेह सापडला. साई पवार हा युवक मुळचा साकूर-मांडवे येथील पण शिक्षणासाठी तो चुलते विकास पवार यांच्याकडे नुकताच बेलवंडी येथे आला होता. तो गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता ११ वीत शिकत होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Politics News :..हीच तर विरोधकांची डोकेदुखी! भाजपचे नेते विश्वनाथ कोरडे काय म्हणाले? वाचा..

Politics News: गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात वाटचाल करत असताना आलेला प्रशासकीय कामांतील अनुभव...

Ahmednagar Crime:..म्हणून तर माझा नवरा गेला? पत्नीने फोडला टाहो; आत्महतेपूर्वी ‘त्या‘ पाच जणांच्या नावाने चिठ्ठीत काय लिहलं?

Ahmednagar Crime: चौघांच्या नावाने एक चिठ्ठीत लिहत नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी...

ओबीसींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता ‘त्या’ दाखल्याची गरजच नाही..

मुंबई । नगर सहयाद्री:- महाराष्ट्र सरकारने ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला...

पराभवाला सामोरे जावे लागणार? ‘या’ राशींच्या जातकासाठी आजचा दिवस कसा? वाचा..

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात....