spot_img
देश"महाराष्ट्राला काय ठेंगा" । विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर निशाणा..

“महाराष्ट्राला काय ठेंगा” । विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर निशाणा..

spot_img

मुंबई । नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प मंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना अर्थसंकल्पातून मोठं पॅकेज जाहीर झाले.

महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा असून, याबदल्यात महाराष्ट्राला काय, असा सवाल विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी करत ‘ठेंगा!’, असे उत्तर देखील दिले आहे. देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? असा देखील वडेट्टीवार यांनी प्रश्न केला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून अर्थसंकल्पात या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. आंध्र प्रदेशासाठी 15 हजार कोटीचे विशेष पॅकेज जाहीर केले, तर बिहारमधील रस्ते प्रकल्प उभारणीसाठी तब्बल 26 हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली.

या अर्थसंकल्पात मोदी सरकारने तिसऱ्या टर्मसाठी पाठिंबा देणाऱ्या आपल्या मित्रपक्षांची विशेष काळजी घेतली. परंतु महाराष्ट्राला काय, असा सवाल आता होऊ लागला आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावरून घेरलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. या बदल्यात महाराष्ट्राला काय मिळाले, ठेंगा! असे म्हणत महायुती सरकारला डिवचले आहे. देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्राला नेहमी दुय्यम वागणूक देते हे पुन्हा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणार आणि बजेटमध्ये देखील महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करत, भाजपकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत तुडवला जात आहे, हे कधीपर्यंत सहन करायचं? असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र आणि द्यायची वेळ आली, तर गुजरात किंवा इतर राज्य! महाराष्ट्र आता आपला स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनताच याला उत्तर देईल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प मंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना अर्थसंकल्पातून मोठं पॅकेज जाहीर झाले.

महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाजप सरकारला पाठिंबा असून, याबदल्यात महाराष्ट्राला काय, असा सवाल विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी करत ‘ठेंगा!’, असे उत्तर देखील दिले आहे. देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का? असा देखील वडेट्टीवार यांनी प्रश्न केला आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला पाठिंबा दिला म्हणून अर्थसंकल्पात या राज्यांना भरभरून देण्यात आले आहे. आंध्र प्रदेशासाठी 15 हजार कोटीचे विशेष पॅकेज जाहीर केले, तर बिहारमधील रस्ते प्रकल्प उभारणीसाठी तब्बल 26 हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...