spot_img
अहमदनगरRain update:चिंता वाढवणारी बातमी!‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अर्लट

Rain update:चिंता वाढवणारी बातमी!‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला अर्लट

spot_img

मुंबई। नगर सह्याद्री-
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठे बदल पहायला मिळत आहे. अनके ठिकाणी रखरखत्या उन्हाचा पारा चढतांना दिसत आहे. तर काही भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकरी संकटात राबद्दल आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याची पुन्हा चिंता वाढवणारी माहिती समोर आली असून विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होत आहे. नागरिकांना कधी उन्हाच्या झळा, तर कधी अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. तापमानाचा पार चाळीशीपार गेला असताना मराठवाडा आणि विदर्भात अधून मधून अवकाळी पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत.

या पावसाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. याशिवाय शेतीपिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे विदर्भावर उंच उंच ढग तयार होत आहेत. त्यामुळे ढगातील तापमान शून्य अंशांच्या खाली जाऊन गारांची निर्मिती होत आहे. यामुळे येत्या २४ तासांत राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होणार असून विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्याना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच...

Ahmednagar Breaking: ब्रेकिंग बातमी! खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला!

अहमदनगर | नगर सह्याद्री:- नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गणेश मंडळांच्या...

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणी तरी येणार अन्….; ‘त्या’ घोषणेची शरद पवार यांनी उडवली खिल्ली! श्रीगोंद्याचा उमेदवार ठरला?

Ahmednagar Politics News : मुंबईतून कोणीतरी येणार आणि आमच्या जागेवर हक्क सांगत लढण्याची भाषा...

Ahmednagar Politics News :’बोलबच्चन करून पाच-दहा वर्षे जनतेला फसविता येते’; खा. नीलेश लंके यांचा माजी खा. सुजय विखे यांना टोला

श्रीगोंदा | नगर सह्याद्री:- जनतेला बोलबच्चन करून पटवता येत नाही. बोलबच्चन करून पाच-दहा वर्ष जनतेला...